Bhashanrang : Vyaspith Ani Rangpith | भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
Bhashanrang : Vyaspith Ani Rangpith | भाषणरंग : व्यासपीठ आणि रंगपीठ
संपूर्ण शास्त्रीय संशोधनावर आधारलेल्या या पुस्तकाच्या अभ्यासाने आवाजात आणि भाषणात निश्चितच बदल घडून शकतील.
पंडित गजाननबुवा जोशी, पंडित लक्षमणराव बोडस, पंडित प्रल्हाद गानू, प्रो. बा. र. देवधर या गायनगुरूंचे मार्गदर्शन लाभलेल्या अशोक दा. रानडे यांनी विद्यापीठ संगीत केंद्राच्या संचालक पदाबरोबरच आर्काईव्हस ऍंड रीसर्च सेंटर फॉर एथनोम्युसिकॉलॉजी येथे पहिले सहाय्यक संचालक व राष्ट्रीय संगीत नाट्य केंद्राचे उपसंचालक अशी पदे भूषवली आहेत. ते स्वत: संगीताचार्य आणि पंडित म्हणून ओळखले जातात.
अनेक नाटके व अनुबोधपट यासाठी त्यांनी संगीतयोजना केली आहे. 'एक झुंज वार्याशी' या नाटकाच्या संगीत योजनेसाठी महाताष्ट्रराज्य व्यावसायिक नाट्यस्पर्धेत सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शनाचे पारितोषिक रानडे यांना मिळाले. बैठकीची लावणी, देवगाणी, राधा इ. कार्यक्रमाचे संकल्पन, संगीत व निरूपण चर्चेचा विषय झाले आहे. तसेच त्यांचे दूरदर्शनवरील कार्यक्रम.
त्यांचे हे पुस्तक प्राध्यापक, पुढारी यांच्यापासून अभिनेत्यापर्यंत सर्वांनाच उपगोयी पडणारे, बोलण्यात सुयोग्य व संपूर्ण बदल घडवून आणणारे आहे.मनुष्य किंवा प्राणी यांच्या कंठातील यंत्रणेतून निर्माण होऊ शकणारा विशिष्ट ध्वनी न्हणजे आवाज. काहीसे अलंकारिक बोलायचे तर भाषणामागची शक्ती किंवा क्षमता म्हणजे आवाज असेही म्हणता येईल. आवाज या माध्यमाचे व्यासपीठ व रंगपीठ या दोन्ही ठिकाणी फार महत्व आहे. अशोक रानडे हे गेली पंधरा वर्षे या माध्यमाविषयी संशोधन कतीत आहेत.
आवाजाचे दोन आविष्कार - गायन व भाषण. दोहोंचा ध्यानात धेऊन अभ्यास केला तर आवाजाचे मर्म कळते अशी खात्री पटल्याने तसा अभ्यास रानडे यांनी चालवला. यामुळे दोहोंसाठी निरनिराळे अभ्यासक्रम आखणे या पुस्तकातून शक्य झाले आहे.