Chhatrapati Shivaji Ani Tyanche Swarajya Dhoran | छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण
Chhatrapati Shivaji Ani Tyanche Swarajya Dhoran | छत्रपती शिवाजी आणि त्यांचे स्वराज्य धोरण
हे पुस्तक महाराजांचे चरित्र नाही, ना त्यांचा विस्तृत इतिहास. त्यांच्या जीवनातील प्रत्येक महत्वपूर्ण घटनेत (लढाई, मोहीम, राजकारण वगैरे) मोठी सुसूत्रता होती. त्यांना विजय 'मिळाले' नव्हते; त्यांनी ते मिळविले होते. या प्रत्येक कार्यामागे मोठे नियोजन होते. स्वराज्यातील प्रजा सुखी व सुरक्षित झाली ती केवळ त्या भागातील सुलतानी सत्ता निघून गेली या एकमेव कारणास्तव नव्हे; त्याव्यतिरिक्त महाराजांनी वेगवेगळ्या क्षेत्रांत लागू केलेली 'धोरणे' हे एक मोठे कारण होते. राष्ट्र वा देश वा राज्य याच्या विविध अंगांच्या बाबतीत महाराजांची जी धोरणे होती ती या पुस्तकाच्या केंद्रस्थानी आहेत व ती त्यामधील नऊ प्रकरणांतून उघड केलेली आहेत. ही धोरणे त्यांच्या जीवनप्रवाहातून विकसित झालेली असल्यामुळे त्यांची सत्यता समजण्यासाठी महाराजांच्या जीवनातील महत्वाच्या संबंधित घटना आणि त्यांचे व्यक्तिमत्व यांबाबतही माहिती असणे आवश्यक ठरते. या कारणास्तव पुस्तकाच्या पहिल्या पाच प्रकरणांत महाराष्ट्राची तत्कालीन परिस्थिती व महाराजांचा जीवनसंग्राम हे संक्षिप्तपणे दिलेले आहेत. __ लेखकाच्या मनोगतातून