Dnyanasuryache Akash | ज्ञानसूर्याचे आकाश

Dnyanasuryache Akash | ज्ञानसूर्याचे आकाश
निवृत्ती,ज्ञानदेव,सोपान,मुक्ताबाई या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात. निवृत्ती हे ज्ञानदेवांचे मोठे बंधू आणि गुरू, तसेच सोपान-मुक्ताईचेही मोठे बंधू. त्यामुळे या चौघांच्याही जीवनाशी निगडित सर्व घटना याही कादंबरीत अपरिहार्यतेने येतात; पण त्या घटनांकडे पाहण्याचा निवृत्तिनाथांचा दृष्टिकोन, भावंडांवर मायेची पाखर घालणं, ज्ञानदेवांचं गुरूपद स्वीकारणं इ. बाबींतून निवृत्तिनाथांच्या व्यक्तिमत्त्वाचे पैलू या कादंबरीतून उलगडत जातात. निवृत्ति-ज्ञानदेव-सोपान-मुक्ताबाई या चार अलौकिक मुलांना जन्म देणार्या विठ्ठलपंत आणि रुक्मिणीबाईंचे ज्येष्ठ अपत्य म्हणून निवृत्तिनाथांचा जन्म होणं आणि तीन भावंडांना सामधिस्थ होताना त्यांना पाहावं लागणं, नाथपंथाची दीक्षा घेऊनही विठ्ठलभक्ती आणि भागवत धर्माशीही त्यांनी स्वत:ला जोडून घेणं, हेच निवृत्तिनाथांच्या जीवनातील वेगळेपण ही कादंबरी अधोरेखित करते.