Hindu Muslim Vaimansyachi Aitihasik Mimansa | हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा

Hindu Muslim Vaimansyachi Aitihasik Mimansa | हिंदू मुस्लिम वैमनस्याची ऐतिहासिक मीमांसा
१९२०खिलाफत आंदोलन ही हिंदू- मुस्लिम, समस्येची गंगोत्री. १९३७ ते १९४७ मधील काँग्रेस लीग राजकारण हा त्याचा उत्कट बिंदू, स्वराज्य म्हणजे काँग्रेसचे राज्य ही गांधींची निष्ठा, स्वराज्य म्हणजे हिंदू मुसलमानांची सतत भागिदारी या समांतर संकल्पनांना मीलनबिंदू नाही हे १९३७ साली संयुक्त प्रांतात कॉंग्रेस - लीग संमिश्र मंत्रीमंडळ बनवण्याचा जीनांचा प्रस्ताव काँग्रेसने ठोकरला तेव्हाच सिद्ध झाले. यानंतर जीनांच्या दृष्टीने स्वतंत्र सार्वभौम मुस्लिम राष्ट्राला पर्याय नव्हता व ते त्यांनी हिंसाचार करून मिळविले. आजही हिंसाचार हीच हिंदू- मुस्लिम समस्या आहे. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरूवात केव्हा झाली ? पहिल्या महायुद्धात खिलाफत आंदोलनाचे प्रणेते मौ. महमद अली यांना स्थानबद्ध करण्यात आले पण इंग्रजांची जरब एवढी की मुसलमानांनी दंगल जाऊ दे. साधा निषेधमोर्चा देखील काढला नाही. मुसलमानांच्या हिंसाचाराला सुरुवात झाली गांधींच्या खिलाफत आंदोलनात. गांधींनी मुसलमानांव हिज्र, जिहाद आणि रक्तमय क्रांती या कुराणाज्ञा आहेत हे बिंबविले आणि काफीर शहादत या संकल्पनांना मान्यता दिली. १९२० साली मुसलमानांना हिंसाचाराची चटक लागली ती आजतागायत सुटलेली नाही. आणि हीच खरी हिंदू- मुस्लिम समस्या आहे. गांधींनी मुसलमानांच्या हिंसाचाराचा पाया घातला आणि त्यावर जीनांनी कळस चढविला. त्याची ही कहाणी आहे.