Kanmantra Aai Babansathi | कानमंत्र आई बाबांसाठी

Kanmantra Aai Babansathi | कानमंत्र आई बाबांसाठी
मुलांना मिळणारे यश पालकांसाठी आनंदाची, समाधानाची बाब असते. यश मिळवण्यासाठी मुलांमध्ये गुणवत्ता विकसित व्हायला हवी. ती निर्माण होण्यासाठी संस्कार, मुलांमध्ये संतुलनाचे महत्व बिंबवणे. त्यांच्या विचारामध्ये बदल घडवून आणणे, विश्वासाचे नाते निर्माण करने, त्यांना पुरेसा वेळ देणे, त्यांच्यात स्वत:चे मत बनविण्याची क्षमता निर्माण करणे, त्या मताचा आदर करणे, आदी गोष्टी महत्वाच्या आहेत. याविषयीचे मार्गदर्शन मनोज अंबिके यांनी 'कानमंत्र आई-बाबांसाठी' मधून केले आहे. मुलांचे व्यक्तिमत्व फुलविण्याची, त्यांना घडविण्याची जबाबदारी प्रत्येक आई-बाबांची असते. त्यासाठी हे पुस्तक त्यांनी वाचलेच पाहिजे.