Kanyadan |कन्यादान

Kanyadan |कन्यादान
' कन्यादान ' या नावापासूनच कौंटुबिक जिव्हाळ्याचे असावे असा आभास निर्माण करणारे हे नाटक आशयाची मोठी उंची गाठते . आज अत्यंत महत्वाच्या ठरलेल्या विषयासंबंधीची एक प्रगल्भ समाजशास्त्रीय जाण या नाटकातून व्यक्त होते . दलित विचारधारणा , समाजवादी विचारधारणा , स्त्री - पुरुष संबंध यासंबंधीचे फार वेगळ्या पातळीवरचे विचार या नाटकाच्या गाभ्याशी आहेत . याविषयीची एक कार्यकर्ते म्हणून असलेली विजय तेंडुलकरांची मते सर्वज्ञात आहेत. आणि तरीही हे नाटक कुठेही प्रचारकी होताना मात्र दिसत नाही . कारण नाटकातील प्रत्येक पात्राचे मानसशास्त्रीय आकलन लेखकाला आहे . नाथ देवळालीकर , सेवा , ज्योती , अरुण , एवढेच नव्हे तर संपूर्ण नाटकात जवळ जवळ नगण्य ठरलेला जयप्रकाश यांचे परस्परांतले संबंध स्वाभाविक वाटतात . त्यांच्या विचार करण्याच्या , वागण्याच्या पद्धतीत लेखकाचा विचार डोकावत नाही . हेच या नाटकाचे फार मोठे यश आहे.