The Legend Of Bahirji Naik : Siege Of Panhala | लिजंड ऑफ बहिर्जी नाईक : पन्हाळ्याचा वेढा

The Legend Of Bahirji Naik : Siege Of Panhala | लिजंड ऑफ बहिर्जी नाईक : पन्हाळ्याचा वेढा
मराठा स्वराज्य १६६५ : प्रचंड मोठ्या मुघल फौजेने पुरंदरला वेढा घातला आहे अफगाणी सरदार दिलेरखान आणि मोठा नावलौकिक असलेले राजपूत सरदार मिझोराजे जयसिंग त्यांचे नेतृत्व करत आहेत. नुकतेच पंख फुटू लागलेल्या मराठा साम्राज्याला सगळ काही संपल्यासारखे वाटत होते. शिवाजी राजे सगळ्या बाजूंनी वेढले गेले होते, यातून चतुराईने कसा मार्ग काढता येईल याबद्दल राजे आपल्या सल्लागारांशी चर्चा करत आहेत. पण इतिहासाची पुनरावृत्ती होणारच. मुघल आणि आदिलशाही फौजांनी, गुलाम-सरदार असलेल्या सिद्धी जौहरच्या नेतृत्वाखाली आधीच स्वराज्याला वेढा घातला होता. आणि खुद राजे पन्हाळगडावर अडकले होते. आणीबाणीच्या वेळी धाडसी उपाययोजना करणे आवश्यक असते. रात्रीच्या अंधाराआड, थेट शत्रूच्या नाकासमोरून त्यांची सुटका करण्यासाठी एक अत्यंत धोकादायक योजना आखली गेली. तिथून निसटून ते विशाळ गडावर कसे पोहोचले याची चित्तथरारक कथा आणि त्या अनुषंगाने येणारी, मुघल फौजेला नेस्तनाबूत करून टाकणाऱ्या उंबरखिंडीच्या लढाईची कथा. शिवाजी राजांचे प्रसिद्ध गुप्तहेर किंवा गुप्तहेर खाते असलेल्या बहिर्जी नाईक यांच्या नजरेतून ही कथा उलगडत जाते. जे काही घडले ते, जगाने कधीच न पाहिलेल्या गनिमी काव्याचे एक सर्वात मोठे उदाहरण बनून गेले.