Uttar - Adhunikata Ani Marathi Kavita | उत्तर - आधुनिकता आणि मराठी कविता

Uttar - Adhunikata Ani Marathi Kavita | उत्तर - आधुनिकता आणि मराठी कविता
आधुनिक मराठी कवितेच्या इतिहासात पहिला टप्पा केशवसुतांचा मानला जातो तर दुसरा टप्पा मर्ढेकर, मुक्तिबोध यांचा आणि दिलीप चित्रे, अरुण कोलटकर, विलास सारंग यांचा तिसरा टप्पा मानला जातो. या तीनही टप्प्यांवर कवितेने जी नवनवीन वळणे घेतली त्यावर आजपर्यंत मराठी साहित्यविश्वात सातत्याने चिकित्सा होत आली आहे. त्यापुढील नव्वदोत्तर कालखंडात संपूर्ण जगभर जागतिकीकरणामुळे जे आमूलाग्र बदल झाले त्याचा साहित्यावरही फार मोठा परिणाम झाला. या नव्वदोत्तर कालखंडात मानवी जगण्यावर झालेल्या विविधांगी बदलांचा अंतर्बाह्य वेध घेणाऱ्या नव्या उत्तर-आधुनिक कवितेची मात्र पद्धतशीर चिकित्सा आजपर्यंत झालेली नव्हती, ती प्रथमच या ग्रंथातून सैद्धान्तिक स्तरावर होत आहे, हे या ग्रंथाचे आगळेपण आहे.